Uncategorized

आषाढी वारी यशस्वी  करण्यासाठी सर्व विभागांनी टीम म्हणून काम करावे – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

सर्व यंत्रणांनी वारकरी, भाविकांना मागील वारी पेक्षा अधिक चांगल्या व उत्कृष्ट सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावेत

नदीपात्रात भाविकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन ते तीन वॉच टॉवर उभा करावे

एसटी महामंडळाकडून यावर्षी आषाढी वारीसाठी पाच हजार पाचशे बसेस चे नियोजन

प्रत्येक शासकीय विभागात परस्परात चांगला समन्वय असला पाहिजे

वारी कालावधीत कोणीही रजा घेऊ नये, कोणीही मोबाईल बंद ठेवू नये, अन्यथा
कारवाई करण्यात येईल

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर, दिनांक 5:- आषाढी वारी 2026 यशस्वी व संस्मरणीय करण्यासाठी सर्व शासकीय विभाग प्रमुखानी परस्परात योग्य समन्वय ठेवावा. वारकरी, भाविकांना मागील वर्षीच्या वारीपेक्षा यावर्षीच्या वारीत अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी सर्व विभागांनी एक टीम म्हणून काम करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त शितल तेली -उगले यांनी केले.

 

येथील केपीबी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित आषाढी वारी 2026 अनुषंगाने आढावा बैठकीत श्रीमती तेली – उगले मार्गदर्शन करत होत्या.
यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस., मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अप्पर आयुक्त तुषार ठोंबरे, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे, तसेच संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त शितल तेली उगले पुढे म्हणाल्या की, आषाढी वारी पालखीतळ, विसावा व मुक्कामाची ठिकाणे, पालखी मार्ग ज्या ग्रामपंचायती व नगरपालिकेच्या हद्दीत आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी पालखी पुढे गेल्यानंतर पुढील चार ते पाच तासात त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली गेली पाहिजे. तसेच या ठिकाणी वारकऱ्यांना पिण्याचे उच्च वर्ष ते पाणी मिळाले पाहिजे. तसेच या ठिकाणी कायमस्वरूपी व तात्पुरती शौचालये दिवसातून किमान तीन ते चार वेळेस स्वच्छ केली पाहिजे, यासाठी पुरेसे मनुष्यबाण संबंधित यंत्रणांनी ठेवले पाहिजे तसेच या ठिकाणी प्रकाशव्यवस्था, अग्नि प्रतिबंधक व्यवस्था, आरोग्य पथके व्यवस्था योग्य पद्धतीने ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
आरोग्य यंत्रणेने वारी कालावधीत येणार्‍या सर्व भाविकांना व वारकऱ्यांना विटामिन ए व विटामिन डी च्या टॅबलेट शंभर टक्के पुरवठा करावा. वारी कालावधीत कोणत्याही अधिकारी कर्मचारी यांनी राजा घेऊ नये, त्यांच्या वरिष्ठांनी त्यांच्या राजा मंजूर करू नयेत. त्याप्रमाणेच या कालावधीत कोणीही आपला मोबाईल बंद ठेवू नये, अन्यथा अशा अधिकारी कर्मचाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देशही आयुक्त श्रीमती तेली यांनी दिले.
वारी कालावधीत सुविधा देत असताना फिल्डवरील अधिकाऱ्यांनी अधिक गतिमान पद्धतीने काम करणे अपेक्षित आहे. काही ठिकाणी पालखीतळ हायवे पासून आत मध्ये आहे त्या ठिकाणी जिल्हा परिषद बांधकाम विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागांनी त्या ठिकाणी पालख्या दिंड्या वारकरी जाण्यासाठी जोड रस्ता तात्काळ तयार करून द्यावेत. वारीकाळात उजनी धरणातून पाणी सोडण्याबाबत योग्य नियोजन करावे. वाळवंटा नदीच्या दोन्ही बाजूला दोन-तीन वाजता वर उभा करावेत व नदीपत्रात जाणाऱ्या भाविकांवर योग्य नियंत्रण ठेवावे. पोलीस विभागाने गर्दीवर नियंत्रणासाठी काळजी घ्यावी. पुरेसा बंदोबस्त ठेवावा, सर्व संबंधित विभागाने त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी असे निर्देश आयुक्त श्रीमती तेली यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी आषाढी वारीच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या कामाची माहिती दिली. यावर्षी सीसीटीव्ही च्या माध्यमातून या वापरून हेड काउंटिंग करण्यात येणार आहे. तसेच मल्टी ड्रोन वापर करून सुरक्षा यंत्रणा तसेच हेड काउंटिंगही करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने दहा दिवस अगोदर तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून अन्न व धान्याचे तसेच प्रसादाचे नमुने घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गटविकास अधिकारी अमोल जाधव, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे तर मंदीर समितीचेकार्यकारी अधिकारीराजेंद्र शेळके यांनी वारीच्या अनुषंगाने त्यांनी केलेल्या नियोजनाची माहिती बैठकीत सादर केली.
000000000

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close