पंढरपूर सायकलर्स क्लबचा अनोखा उपक्रम… पर्यावरण संवर्धनाशी बांधिलकी कायम

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर:- सायकलींग तर व्यायामासाठी सगळेच करतात पण त्याही पलीकडे जाऊन आपण निसर्गाचे,पर्यावरणाचे काहीतरी देण लागतो म्हणूनच “पंढरपूर सायकलर्स क्लब,पंढरपूर” तर्फे रविवार दिनांक २२/०१/२०२३ रोजी ५० कि.मि.सायकल राईडचे पंढरपूर-करकंब-पंढरपूर असे आयोजन करण्यात आले होते .याच राईड दरम्यान क्लब च्या सदस्यांनी करकंब येथील पुरातण बारव स्वच्छता करण्यात आली.
भारतात पाण्याची एक ‘इको सिस्टीम’ आहे,पण त्यातल्या पारंपरिक जलस्रोतांचा वापर थांबला आहे.विहीर बारवांचं पुनरुज्ज्वीन केल्यानं लोकांना हे पारंपरिक स्रोत आणि स्वच्छ पाणी व त्यावर आधारलेलं समाजजीवन परत मिळेल.मोठ्या विहिरींची पाणी धरून ठेवण्याची क्षमता पाहता, पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी त्या महत्वाच्या ठरतील,”असा आशावाद सदस्यांनी व्यक्त केला .
पुर्वजांनी जलव्यवस्थापन करीत असताना बाराही महीने पाण्याची गरज खात्रीने भागविणारे जलाशय म्हणजे “बारव” ची निर्मिती केली.सद्य परीस्थीतीत बारवची स्थिती अतिशय हालाकीची आहे.त्यांच्या जतना साठी त्यांना स्वच्छ करून हा वारसा आपण जपला पाहीजे.हे काम शासनाने करण्या ऐवजी समाजाकडून झाल्यास खुप आत्मियतेने होते. नाहीतर हा ऎतीहासीक वारसा आपल्या हातून गेल्याशिवाय राहणार नाही.
समस्त करकंबकरांना या ऎतीहासीक बारवेचे महत्व कळावे त्यांनी ते गांभिर्याने घ्यावे व येणा-या काळात हि बारव अशीच स्वच्छ राहून त्यातील झरे स्वच्छ झाल्यास या मध्ये असलेल्या पाण्याचा उपयोग समस्त करकंब करांची तहान भागविण्यात त्याचा फायदा होईल असे मत ही पंढरपूर सायकल क्लबच्या सदस्यांनी व्यक्त केले
करकंब येथील जागर स्वच्छता अभियान टिम व पंढरपूर सायकलर्स क्लब पंढरपूर च्या ४० पुरुष व १५ महीला उत्साही रायडर्सने या बारव स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला शिवाय याच ऎतीहासीक मोहीमेची आठवण म्हणून करकंब येथील स्मशानभूमी मध्ये “बहावा” चे वृक्षारोपन केले.
पंढरपूर सायकल क्लब च्या या उपक्रमा बद्दल सर्व स्तरावरून कौतुक होत आहे