नवीन शिधापत्रिकेसाठी व बंद असलेल्या शिधापत्रिकेसाठी उत्पन्न दाखल्याऐवजी हमीपत्र ‘ग्राह्य’
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या मागणीला यश -प्रा.सुभाष वायदंडे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
सांगली:-नवीन शिधापत्रिकेसाठी व बंद असलेली शिधा परत मिळण्यासाठी ग्रामीण भागासाठी ३५०००/-(पस्तीस हजार रुपये) व शहरी भागासाठी ४४०००/-(चव्वेचाळीस हजार रुपये ) अशी उत्पन्नाची अट होती व सदरचा उत्पन्नाचा दाखला तहसीलदारा कडून आणने बंधनकारक होते यासाठी गेली तीन वर्षे पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने वारंवार निवेदने व आंदोलने करून उत्पन्नाच्या दाखल्याची अट्ट रद्द करण्याची मागणी होत होती अखेर अन्न व नागरी पुरवठा खात्याने यासंबंधीचा अध्यादेश काढून उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी सदर कुटुंबउत्पन्नाच्या दाखल्याऐवजी सदर कुटुंबप्रमुखांनी उत्पन्नाचे लेखी हमीपत्र दिल्यानंतर त्याची शिधा चालू होईल असा अध्यादेश काढल्यामुळे नागरिकांना आता सोयीचे झाले असून अखेर पुरोगामी संघर्ष परिषदेच्या आंदोलनाला यश आल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक प्रा सुभाष वायदंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने काढलेल्या नवीन अध्यादेशानुसारआता नवीन शिधापत्रिका घेण्यासाठी तहसीलदारांच्या उत्पन्नाच्या दाखल्या ऐवजीअर्जदाराने उत्पन्ना बाबत दिलेले हमीपत्र ग्राह्य धरले जाणार असून या निर्णयामुळे नागरिकांनी आता तहसील कार्यालयाकडे उत्पन्नाच्या दाखल्यासाठी हेलपाटे घालायचे थांबवून थेट पुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेऊन हमीपत्र सादर करावेआणि नवीन अध्यादेशामुळे राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचे लाभार्थी नसलेल्याही शिधापत्रिका धारकांना वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाचे हमीपत्र सक्षम प्राधिकार्याकडे सादर करून धान्य घेण्याचे आवाहन पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे याबाबतीत बोलताना प्रा. वायदंडे यांनी म्हटले आहे की, नागरिकांनी कुटूंबाचे हमीपत्र रेशन कार्यालयामध्ये द्यावे त्यासाठी कोणत्याही एजंटाला बळी पडू नयेअसेही आवाहन करून शेवटी म्हटले आहे की, काही रेशन दुकानात नागरिकांना धान्य द्यायचे बंद केले आहे व काही ठिकाणी अपुरे धान्य दिले जाते अशावेळी नागरिकांनी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कार्यकत्यशी संपर्क साधावा किंवा सरकारकडून देण्यात आलेल्या 1800-22–4950 या मदतीचा नंबर वर संपर्क साधावा.


