Uncategorized
समाधान दादाच्या पाठीमागे जाऊन पुन्हा एकदा आमदार करू–विजयसिंह देशमुख

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
कासेगाव :-आपण सगळी भारतनाना वर प्रेम करणारी माणस पण नाना आपल्या मधून निघून गेल्यावर आपल्याला आता नेतृत्व राहिलेले नाही आणि आज आपण मनापासून प्रत्येक गावात जाऊन चाचपणी करतोय प्रत्येक लोकांनी आपल्याला एक निर्णय दिला की तुम्ही काय निर्णय घेतात ..
पूर्वी जे नेतृत्व होते ते राहिले नाही म्हणून म्हणून सगळे मिळून समाधान दादाच्या पाठी मागे जाऊ या आणि अजून एकदा आमदार करू या अशी भावना विजय सिंह देशमुख यांनी केली.
विजयसिंह देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष असुन भारतनाना भालके यांचे समर्थक आहेत.

जिल्हा नियोजन समितीवर आ.समाधान आवताडे यांची निवड झाली.त्याबद्दल सत्कार आयोजित केला होता.त्या कार्यक्रमात ते बोलत होते.



